Tuesday, November 07, 2006

अश्रू...

-
दु:ख बिचारे आतल्या आत
कुढत असते आपल्या जगात,
मुक्त व्हावे, कधी वाटते त्याला
येते पाणी दोन्ही डोळ्यात ।

शब्दही जेव्हा संपतात
डोळ्यातून अश्रू बाहेर येतात,
शब्दापलीकडले सारे काही
चार थेंब बोलून जातात ।

आपणच दु:ख मनात ठेवतो
अश्रुंना कठोर धरण बांधतो,
रडण्यात काही गैर नाही
देवही नेमाने पाउस पाडतो !

नव्हेत थेंब खाऱ्या पाण्याचे
अश्रू बनले आहेत रक्ताचे,
मनाला हलके करणारे
आहे वरदान हे देवाचे ।

एक क्षण असतो रडण्याचा
मनाला स्वच्छ करण्याचा ,
रडताना बाहेर, आतमध्ये
काही निश्चय करण्याचा ।

दुसरा क्षण असतो मोलाचा
डोळे पुसून उभे राहण्याचा,
मनीचे संकल्प साकार करून
पुन्हा दिलखुलास हसण्याचा ।

- प्रणव

3 Comments:

Anonymous Anonymous said...

क्या बात है !!!
१ लं आणि ४ थं कडवं सोडुन बाकिची छान आहेत !!!

November 17, 2006

 
Blogger Ninad said...

Ek number pandya...
aani mala 1st aani 4th kadave pan aavadle...
i think they were required for poem to have a flow.....

November 20, 2006

 
Blogger veerendra said...

ग्रेट्च् बरका !!

January 18, 2007

 

Post a Comment

<< Home